Saturday, June 5, 2021

भाग दुसरा

         नाऱ्या ला शांत करत असताना मी चिडलेलं पाहुन भाऊ ने विचारलं ? अरे एवढ काय चिडतोस त्यावर. तो फक्त मजाक करतोय न. मी थोड सावध घेत शांत झालो,पण नाऱ्या माझ्याक्ड पाहून वेगळच तोंड करत म्हणाला,सांगू का? आssss,आ.... मी परत त्याला ओरडू लागलो.मग मला थांबवत भाऊ ने नाऱ्या ला सांग रे म्हणल व पण मी नाऱ्या ला धमकावत होतो.मला भाऊ अडवत,तू सांग नाऱ्या मी आहे बोल तू....काही नाही भाऊ,हे सदाच असं करत. दहावी ला असताना पास झाल्यावर आयटीआय कराव म्हणल तर म्हणल पुढी शिकणारच नाही व त्या सायलीने ११ वी १२ कर म्हटलं की लगे तयार झाल बघ...व मला पण सोबत घ्याला लावलं अडमिशन,भाऊ नाऱ्या ला थांबवत,काय म्हणाला तू सायली!! भाऊ हसत माझ्याकडे पाहिलं व प्रश्नार्थक रित्या विचारणार इतक्यात मी नाऱ्या चल मी चलतो....म्हणत तेथून पळ काढली. भाऊ मला थांब म्हणत होता,पण त्याच्या प्रश्नांना कोण उत्तर द्याव म्हणून मी पळ काढली. 

          घरी येऊन आई ला अग मी खरच पास झालो म्हण, आई उद्गारली शाळेला न जाता ??? हो य आताच पवन भाऊ ला विचारून आलो.हुं मग आता काही काम करणार कि नाही ? कि आणि बसूनच खाणार ? आजोबा मागून ओरडले. मी काही बोलणार एवढ्यात आणखी एक शब्द टाकले,जा तिथ ढोर उपाशी आहेत. पाणी बिनी पाजव जा बर पटशी.. म्हणत आजोबांनी मला शेताला धाडलं. 

         दुसऱ्या दिवशी गावात फिरत असताना पवन भाऊ अचानक भेटला,मला आता पळताही येत नव्हत,थोड चोरुनच पाहून पाहिलं नसल्यासारखं करत मी पुढे जाऊ लागलो. त्याने अचानक मग ,ऐ सायली म्हणून हाक मारली.....मी वेगाने मागे वळून भाऊ ला शांत केलो. त्यावर त्याने बसण्यास सांगितलं व तू सायली नावाने एवढ का चीडतोयास? खर सांग काय आहे? मी कोणाला नाही सांगत म्हणत तो मला विचारण्याचा प्रयत्न करू लागला.मग मी एक एक शब्द फोडत,काही नाही भाऊ ती माझ्या वर्गातली आहे एवढच. भाऊ ला मनासारखं उत्तर न मिळाल्याने मग नाऱ्या पण तुझ्याच वर्गातला न, मग तो का चिडत नाही रे तिच्या नावाने ? खर- खर काय ते सांग नाही तर तुला सायलीच म्हणून गाव भर करेन बघ.हे नाऱ्या त्यन उग काय पण म्हनतेत भाऊ,तीच न माझ हजरी क्रमांक लागून आहे न,उग मला चीडवतेत हे,...

    पण नाऱ्या तर काल वेगळच काय सांगत होत मला, दहावी मधल... 

ऐ नाही भाऊ काही,सांग आता लवकर सांग....,

नववी - दहावीत होतो न तेव्हा मी तिला खूप बोलायचं,रोज शाळेला जाताना तिच्या घरापासून जाऊन तिच्या सोबत बोलत जात होतो, मग मला समजल नाही कि कधी तिच्याबद्दल वेगळ्या भावना मनात जागृत झाल्या. मग तेव्हा पासून तर जास्तच बोलत होतो. व तिला बोलल कि एकदम ख़ुशी व्हायची. मग हे मी एकदा नाऱ्या ला सांगीतलो.तर त्याने मग मला म्हटल कि खर ती तुलाच जास्त बोलते मग तू तिला विचार तर? मी विचारायचं ठरवलो पण हिम्मत व्हायची नाही,म्हणून मग कविता लिहायचो व शाळेला जाताना तिला वाचायला द्यायचो. ती हि खूप भारी म्हणून मला आणखी प्रोत्साहन द्यायची. पण मनातून होकार द्यायची कि नाही हे कळायचं नाही. पण मग दहावी च्या परीक्षे पुढे - पुढे तिने बोलन कमी केल,म्हणजे शाळेला आमच्या सोबत वगैरे येत नसे. मग मला पण थोड राग आला व मी पण तिच्याशी बोलन बंद केल. पण परीक्षेच्या एक दिवस आधी हॉल - तिकीट घ्यायला शाळेत गेलो होतो तर तेव्हा बोलली. म्हणली मला बोलणं का बंद केल? मी म्हटलं मग तू पण बोलत नव्हतीस न, शाळेला पण सोबत येत नव्हतीस,म्हणून जाऊदे ब म्हटलो... मग तिने हुं म्हणत माझ्या हातावर एक कागद ठेवला व निघून गेली.....

एवढ्यात तिथे केव्हा आजोबा आले समजलच नाही, आर असं निवांत बसायचे काम आमचे आहेत...जावा बघा शेताकड काहीतरी म्हणत बाबांनी मला तिथून उठवल, मी येतो पुन्हा म्हणत भाऊ पासून राम-राम घेतला.

  

Friday, June 4, 2021

भाग पहिला

 पवन भाऊ,...आमचे १२ वी चे परीक्षा खरच न्हाईत का र ?

हे नाऱ्या म्हणत आहे_ आम्ही असच पास झालो,म्हणून अन ते खर आहे का ?

हो,रे तुम्ही पास झालात...

यावर मला खूष व्हाव कि रडावं हेच समजत नव्हत.रडायला म्हटलं तर या वर्षी काहीच अभ्यास केला नव्हता.तासिका झाल्या पण त्या मोबाईल वर मग आम्ही अगोदरच सांगून टाकल होत कि सर माझ्याकडे मोबाईल नाही...त्यामुळे त्याच विषयच नव्हता,यावरून पास होण हे अशक्य होत. मग खूष झालेलं बर,पण खूष व्हायचं तर सायली सोबत ची भेट हुकली. अगदी १० वी नंतर पुढे शाळा नको म्हणून मोठ्या भावाचा आदेश होता,तेव्हा मी सायली च्या नादा साठी १२ केली व ती आता संधीच हुकली. हा विचार करत मी पवन भाऊ च्या बाजूलाच शांत बसलो होतो. 

७ वी मध्ये असताना, तिची नी माझी ओळख खेळाच्या तासात झालेली. आम्ही खो - खो खेळत होतो.ती जेव्हा मला खो देण्यास झुकली तेव्हा मी अचानक पुढे पळण्याचा प्रयत्न केला व ओठांवर पडलो. सर्व जन येऊन उठवले व जास्त लागल नाही न याची खात्री करत होते. पण ओठांवर पडल्यामुळे माझ्या ओठांतून रक्त वाहत होत. तेव्हा सर जवळ आले व काही होत नाही,हळद लाव त्यावर म्हणत...नाऱ्या किचन मधून हळद आन बर म्हणत आदेश दिला.तेवढ्यात नाऱ्या जाऊन हि आला व सर बाई नी त्याला कुलूप लावून घरला गेल्या. मग रे हळद आता कुठ भेटेल....यावर हळूच सायली म्हणाली_सर मी याला माझ्या घरी घेऊन जाऊ का ? माझ घर जवळच आहे न.त्यावर सरांनी होकार दिला.सायली व नाऱ्या दोघे जाऊन आमचे दफ्तर घेऊन आले व आम्ही पाठीवर अडकून निघालो सायली च्या घरा... 

घरी तिची आई एकटीच होती.आम्हाला पाहून ती अचानक अचाम्भून गेली व ,सायली का झाल ग एवध्या लवकर कसकाय शाळेतून घरी आलीस. त्यावर सायली आई ला समजावून सांगू लागली,आई हा आता शाळेत खेळत असताना पडला मग त्याला हळद लावायची म्हणून घरी घेऊन आले... म्हणत ती आत गेली व दफ्तर ठेवून पाणी देत बाहेर आली. मी ओठावर व तोंडावर पाणी फिरवून आत गेलो. बसायला खुर्ची देत ती परत आत गेली व हळद घेऊन आली. तोवर आई आमच्या सोबत बोलत होती. तुम्ही कोणाचे नातू आहात वगैरे यावर चर्चा चालली होती. तेवढ्यात सायली हळद घेऊन आली व मला लावण्यास दिली.मग तोपर्यंत रक्त अगदीच थांबलेलं होत. मग सायली हि आमच्या सोबत चर्चेत सहभागी झाली. आम्ही थोडावेळ बसून आमची बस लागते म्हणत निघालो. 

पुढे असच,सायली सोबत ची मैत्री वाढत गेली. कधी काही अचानक काम पडले असता तिच्या घरी जायचं,अथवा ती शाळेत का आली नाही यासाठी.केव्हा स्वाध्याय पुस्तिकेसाठी तर केव्हा सहली साठी.पण या हि पेक्षा महत्वाच म्हणजे आमचे हजेरी क्रमांक_ मागे पुढे असल्याने आमची मैत्री आणखीन घट्ट झालेली होती. सातवी,आठवी,नववी आम्ही मजेत काढली. पुढे दहावी बोर्ड, मग आमच सेंटर दुसऱ्या गावी होत,यासाठी थोड मनात धाकधूक होतीच पण तिथेही आम्ही एकाच वर्गात यायचो त्यामुळे त्या हि परीक्षेची भीती गेली व दहावी पास आम्ही झालो. 

दहावीचे मार्क मेमो आणि टीसी घेण्यासाठी गेलो असता सायली च्या घरी आवर्जून गेलो,तेव्हा तिला सांगितलं मी तर पुढे नाही बा शिकणार !! भावाने म्हटलं कुठेतरी कामाला ठेवतो म्हणून...त्यामुळे शिक्षण बंद. यावर सायली ने अरे तसं नको करू म्हणत मला १२ विच महत्व पटवून दिल. व मी होकारार्थी मान डोलावत घराबाहेर पडलो व घरी येऊन अन्ना ला मला बारावी काढायचं आहे म्हणून मागे लागलो.अन्ना ने हि मग परवानगी दिली. मग दुसऱ्या च दिवशी टीसी घेऊन मी व नाऱ्या सायली सोबत च्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतलो.

एवढी वेळ शांत बसलेला पाहून नाऱ्या व पवन भाऊ ने मला हलवलं.ऐ___काय झाल ? मी अचानक दचकून काय नाय. नाऱ्या - मग आता तर मानतो न मला, भाऊ मी सांगत होतो तर हे ऐकत नव्हत बघ...हे सदाच असं करत बघ.हो काय म्हणत मी उठलो,...व नाऱ्या ला शांत करू लागलो... 

अलविदा मनीषा (भाग १० )

           मयंक आणि मनीषा जेवण केल्यानंतर मयंक ने मनीषा ला बस मध्ये बसवून दिला व मनीषा तासाभरात गावी पोहोचली. घरी येताच मम्मी ला सांगितली मी...